Wednesday, August 7, 2019

सासरी आल्या नंतर...


मी लग्न करुन सासरी तर आली पण मला तिथे करमतच नव्हते. सतत घरची आठवण येत होती. कारण माझे आण़ि त्यांचे(पतीचे) विचार जुळतच नव्हते. मला खुप एकटे एकटे वाटायचे तिथे. ते  माझ्या सोबत खुलुन बोलायचे नाही. नवीन घरी मला काय वाटत असेल, मला काय हव, काय नाही हे विचारायला त्यांना वेळ नसायचा. मला एकटेपणाची जाणीव खुप व्हायची.
नवीन नवीन असताना मला त्यांच्या वागण्याचा खूप त्रास झाला.‍ मला त्यांच्यासाठी माझ्या सर्व आवडी निवडी बदलाव्या लागल्या. ते जे म्हणतील तेच. मला खुप बंधन टाकत होते पण त्यांच्या दृष्टीने ते बंधन नव्हाते. मी सर्व गोष्टींचा स्विकार केला.
हळुहळू मला त्यांच्या स्वभावाबद्दल समजू लागले. मी तशी तशी बदतल होती. त्यांचा स्वभाव दिसायला अगदी सायलेंट दिसतो पण मला आज समजले ते सायलेंट नाही आहेत. अगदी जुन्या रुढी परंपरा धरुन चालणारे आहेत OLD Man सारखे अजूनही तसेच आहेत,त्यांना पाश्चिमात संस्कृती बिलकुल आवडत नाही. पण माझ्या अपेक्षा वेगळयाच होत्या.
मी ज्या घरातून आली(म्हणजे माहेरचे घर) त्या घरात आणि आत्ताच्या (म्हणजे सासरचे घर) घरात खुप फरक आहे. म्हणजे खाण-पिणे, राहणे सगळ वेगवेगळया पध्दती. सुरवातीला मला खुप त्रास झाला. प्रत्येकाची स्वयंपाक बनवण्याची पध्दत वेगळी असते माझ तसेच झाले सासरी सगळया पध्दती वेगळयाच त्यामुळे मला प्रत्येक गोष्ट विचाराव लागायची अश्या विचारण्या विचारण्याने घरच्यांना वाटत होते की मला स्वंयपाक जमत नाही. पण तसे काही नव्हते.

No comments:

Post a Comment